★किल्ल्याबद्दल थोडक्यात:-
१) पोहचाल कसे?
नाशिकपासून 15किलोमीटर इगतपुरी कडे जाताना मुळेगाव लागते हेच रांजणगिरी च्या पायथ्याशी असणारे गाव आहे.
२) किल्ल्याची उंची:- 2790 फूट
3) किल्ल्याची श्रेणी:- मध्यम
४) डोंगररांग:- त्र्यंबकेश्वर
५) इतिहास:-
त्या काळी एक मोठी बाजारपेठ म्हणून नाशिक प्रसिद्ध होते. डहाणू बंदरात उतरणारा सर्व माल गोंडाघाट-अंबोली घाट मार्गे नाशिकला येत असे. याच व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी जव्हार जवळ भूपतगड तर घाटमाथ्यावर त्र्यंबकगड, भास्करगड , हरिहर , रांजनगीरी ह्या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली.
६) किल्ल्यावर काय काय पाहणार?
गडावर पोहचताना आधी रांजण सारख्या आकाराच्या सुळक्याला वळसा घालून जावं लागतं ह्याचा रंजनासारखा आकार गडमाथ्यावर गेल्यावर स्पष्ट दिसतो. गडमाथ्यावर पाण्याच्या दोन टाक्या आहेत. गडमाथ्यावरन पूर्वेला वैतरणा धरणाचा जलाशय, गडगडा किल्ला, दक्षिणेला डांग्या सुळका आणि मोठा परिसर नजरेस पडतो.
★महत्वाची टीप:-
रांजनासारखा आकार असलेला सुळका थोडासा काळजीपूर्वक चढावा कारण वाट ही निसरडी आहे.
★पूर्ण माहितीपट आपल्या Youtube चॅनेलवर उपलब्ध आहे नक्की पहा...
पुढे क्लिक करा..
Good information
ReplyDeleteThank you
Delete